Wednesday, May 13, 2020

फडणवीसांचे प्रभावी गटाचे राजकारण!

भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  प्रभावी गटाचे राजकारण सुरू केले आहे. पक्षातील स्वकियांचा विरोध संपून टाकण्यासाठीची ते  कोणतीच संधी सोडत नसल्याचे पहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते पार्टी विथ ए डिफरन्स अशी स्वतःची ओळख सांगत होते. आमच्याकडे पक्षांतर्गत लोकशाही आहे. सर्वजण मिळून चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेतला जातो असे सांगितले जाई.
कॉंग्रेससारखं आमच्याकडे हायकमांड नाही आणि दिल्लीश्वर ही नाहीत असे सांगितले जाई. वाजपेयी अडवाणी यांच्या काळात बऱ्याच प्रमाणात ही वस्तुस्थिती होती. व नरेंद्र मोदी अमित शहा  यांच्या काळात ही परिस्थिती पूर्ण बदलली आहे. 

केंद्रातील काही तर राज्यातील देखील निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेत असताना दिसत आहेत. सध्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी शहा यांच्याकडे असल्याने भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आहेत.पण त्यांना निर्णय घेण्याची किती अधिकार आहेत याबद्दल शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात आधी रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष होते. आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी आहे. सर्वकाही निर्णय घेतात ते देवेंद्र फडणवीस  यांच्या निर्णयानुसार त्यामुळे पक्षांमध्ये कुठे लोकशाही दिसत नाही. पक्षाच्या बैठकीत फक्त एक दोन जणांची भाषणं होतात  असे एकनाथ खडसे यांनी जाहीर मुलाखतीत सांगितले.

मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे अडवाणी मुरलीमनोहर जोशी यांना अडगळीत टाकले त्याप्रमाणे आता महाराष्ट्रातही जुन्या जाणत्यांना पद्धतशीरपणे अडगळीत टाकण्याचे काम सुरू आहे. मुख्य प्रवाहातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे ही त्यातील काही प्रमुख नावे.  एकनाथ खडसे सर्वात जास्त 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदावर दावा करीत होते. पण मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे फडवणीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.  पण खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर जाणे भाग  पाडले. त्यानंतर त्यांना सतत डावलले जात आहे. विधानसभेचे तिकीट नाकारले मंग राज्यसभेत आणि विधान परिषदेत संधी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ती संधी दिली गेली नाही. असे का केले जाते त्याची कारणे दिली जात नाहीत.

 महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असे सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत पद्धतशीरपणे पराभूत केले.  आता विधान परिषदेचे तिकीट कापण्यात आले.  2014 मध्ये विनोद तावडे यांना गृहमंत्री व्हायला आवडेल असे बोलून दाखवले जात होते. त्यांचेही पक्षाने तिकीट कापून टाकली कट टू  साईज केले आहे. सध्या सुरू असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील फडणीसांच्या मर्जीतील नेत्यांना संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. आपल्यापेक्षा कोणीही मोठे होऊ नये यासाठी गांधी घराणे सतत प्रयत्न करते अशी टीका केली जात होती. तेच आज भाजपमध्ये चालू आहे. भाजप मध्ये या टाईप गटबाजी नाही असाही दावा केला जातो. हे ही तितकेसे खरे नाही. आपल्या पसंतीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन राज्यांमध्ये आपल्या प्रभावी गट निर्माण करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू  दिसते. महाराष्ट्रात आपणच भाजपचे कार्यकर्ते आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याची मोदी यांची घोषणा होती पण काँग्रेसमधून मेगा भरती करून भाजप काँग्रेसयुक्त झाला आहे. आता कार्यपद्धती पावलावर पाऊल टाकून भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे.

3 comments:

  1. काँग्रेस मुक्त कार्याचा विजय असो

    ReplyDelete
  2. पण हातात काय पडले याचाही विचार व्हायला हवा

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete