Thursday, December 29, 2022

होय सिंगापूरने जपलं वेगळपण

 सिंगापूर हा देश एका लहान बेटावर बसला आहे. सिंगापूर हे जरी एक लहान बेट असले तरी त्याची व्याप्ती जागतिक आहे. एखाद्या देशाला जागतिक स्तरावर जर एखादे यश संपादन करायचे असेल किंवा आपली ताकद सिद्ध करायची असेल तर त्या देशाचे आकारमान हे कधीच अडथळा ठरत नाही हे आपल्या सर्वांना या महान देशाने दाखवून दिले आहे.  पाचपन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ज्या नदीच्या किनाऱ्यावर जहाजं, व्यापारी, हमाल, पाहुण्यांची गर्दी असायची, त्या नदीनेच नव्हे तर सिंगापूरनेच स्वतंत्र झाल्यानंतर कात टाकली आहे. एखादा देश आपलं व्यक्तिमत्त्व किती आमूलाग्र बदलू शकतो, हे समजून घ्यायचं तर सिंगापूरला भेट दिल्यानंतर आपल्या लक्षात येते.


सिंगापूर... आग्नेय आशियाच्या नकाशातला अगदी टिकलीएवढा छोटासा देश. शेजारच्या मलेशियाच्या आधाराने जगू पाहणारा... पण त्या देशाने झिडकारल्यानंतर हताश न होता अथक प्रयत्नांची कास धरणारा... त्या सिंगापूरने सर्वांगीण प्रगतीची जी गरूडभरारी घेतली, त्याचे वास्तव प साकम ?त्रकाराच्या नजरेतून  मांडताना  वेगळा अनुभव येत आहे.  हा देश उभारण्यामध्ये  प्रेरणा होती ली क्वान यू नावाच्या एका जिद्दी पण द्रष्ट्या नेत्याची. त्या नेत्याच्या अफाट कर्तबगारीची ..सिंगापूरच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या पंतप्रधान ली क्वान यू यांची निर्णय घेण्याची पद्धत, तसेच सिंगापूरच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेले उपाय. पहायला मिळतात. गरुडभरारी घेणाऱ्या सिंगापूरची आजची प्रगती कशी झाली, त्याचबरोबर किती कठोरपणाने तिथं कायदे राबविले जातात. हे पाहणे महत्त्वाचे आहे.



अनेक ठिकाणी थांबून संपूर्ण शहराचं दर्शन घेण्याची इच्छा असते. सिंगापूरमध्ये अशा विहंगदर्शनाची व्यवस्था वेगवेगळय़ा पद्धतीनं वेगवेगळय़ा ठिकाणी केलेली आहे. त्यातील एक आहे सिंगापूर फ्लायर. संथ गतीनं फिरणाऱ्या या अवाढव्य पाळण्यात बसून क्षितिजापर्यंतचा समुद्र न्याहाळता येतो आणि दूरवर पसरलेलं सिंगापूरही पाहता येतं. तासाभराच्या त्या आवर्तनात वेगवेगळय़ा उंचीवरून आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता येतं.


मरिना बे सँड्स हे सिंगापूरमधील एक प्रतिष्ठित हॉटेल. ५६ मजल्यांच्या आणि तीन इमारतींच्या या हॉटेलच्या शिखरावर एक ऑब्झर्वेशन डेक तयार करण्यात आलेला असून, हॉटेलच्या कामकाजात व्यत्यय न आणता पर्यटकांना छप्पनाव्या मजल्यावर पोहोचता येतं. त्या डेकच्या एका बाजूला पसरलाय अथांग सागर तर दुसऱ्या बाजूला उभं आहे अख्खं सिंगापूर. सिंगापूर प्लायरपेक्षाही उंच असलेल्या डेकवरून मनसोक्त सिंगापूर पाहता येतं, न्याहाळता येतं. 

सिंगापूर नदीला अनेक शतकांचा इतिहास आहे. अगदी पाचपन्नास वर्षांपूर्वीपर्यंत याच नदीच्या किनाऱ्यावर जहाजं, व्यापारी, हमाल, पाहुण्यांची गर्दी असायची. त्या गर्दीत चीन, भारत आणि पश्चिम आशियातील लोकांचा भरणा अधिक होता. 


सिंगापूर स्वतंत्र झाल्यानंतर देशाच्या परिवर्तनानं वेग घेतला. १९८०च्या आसपास सिंगापूर नदीच्या कायापालटाच्या कामाला प्रारंभ झाला. दूषित पाणी आणि अस्वच्छ नदीकाठांची साफसफाई सुरू झाली. किनाऱ्यावर असलेली मालगुदामं आणि व्यापार इमारती पुरातन वास्तू म्हणून संरक्षित करण्यात आल्या. नदीच्या दोन्ही तीरांना जोडणाऱ्या जुन्या पुलाचं सुशोभीकरण करण्यात आलं. त्याच परिसरात नंतर उंचच उंच आधुनिक पद्धतीच्या इमारती उभ्या राहू लागल्या.


जुन्या-नव्या वास्तू-इमारतींनी तो भाग गजबजून गेला. सिंगापूर नदीचे काठ स्वच्छ झाले आणि पात्र नितळ! त्या पात्रातून आता बोटीनं फिरण्याची सोय करण्यात आली आहे.  आभाळ उंचीचं हॉटेल मरिना बे सँड्स. चहूबाजूच्या इमारती पाहताना सिंगापूरने केलेल्या प्रगतीचा झपाटा लक्षात येतो. शहर पाहायला आलेल्या पाहुण्यांना एखाद्या उंच ही. एखाद्या खासगी स्टार हॉटेलचा एखादा भाग असा लोकांसाठी उपलब्ध करून देणं ही गोष्टही दखल घेण्यासारखीच आहे. सिंगापूरच्या हार्बर फ्रंट या मेट्रो रेल्वे स्थानकावरून केबल कारने सेंटोसा बेटावर जाता येतं. संथ गतीनं समुद्र पार करणाऱ्या या पाळण्यात बसून सिंगापूर बंदर, सिंगापूर शहर आणि सेंटोसा बेटावरच्या वेगवेगळय़ा इमारती आणि वास्तू पाहता येतात. परिसराचं विहंग दर्शन घडावं या उद्देशानंच केबल कार खूप उंचीवरून नेली आहे. सेंटोसा बेटावर उतरताच सामोरा येतो टायगर स्काय टॉवर. ११० मीटर उंच असलेल्या या टॉवरमधून संपूर्ण सेंटोसा, सिंगापूर शहर आणि क्षितिजापर्यंत पसरलेली सागरसीमा नजरेत येते. टायगर स्काय टॉवरच्या जवळच असलेल्या मेर्लिऑन टॉवरच्या माथ्यावरून परिसर दर्शन करता येते.

Saturday, September 24, 2022

पवारांचा पॉवरफुल गड काबीज करणार?

 पवारांचा पॉवरफुल गड काबीज करणार?


दिगंबर दराडे
बारामती


संपूर्ण देशभरात सुरु केलेल्या मोहिमेनुसार भाजपने बारामतीमध्येही काम सुरु केलं आहे. महत्त्वाच्या नेत्यांच्या सातत्याने इकडे दौरे होतील. पक्ष संघटनेचा आढावा घेतला जाईल आणि लोकांच्या अपेक्षा आणि विकासाचा आढावा घेतला जाईल असं भाजपकडून सांगण्यात येत असले तरी याच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे.
पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकांचं रणशिंग भाजपनं आतापासूनच फुंकलं आहे.


 सर्वात प्रथम अमेठी म्हणजे बारामती नव्हे समजून घेतले पाहिजे. अमेठी आणि बारामतीचा विकास यामध्ये दोन टोकाचे अंतर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सातत्याने देशांमध्ये सरकार विरोधात आघाडी सुरू करण्याचा होत असलेला प्रयत्न जागीच रोखण्यासाठी हा डाव टाकण्यात आला आहे. देशामध्ये आता तरी दुसरे कोणतेही नेतृत्व सरकार विरोधात मोट बांधण्याचा कट रचत नाहीत.  त्यामुळे पवार कुटुंबियांना बारामती मध्ये अडकवण्याचा हा डाव असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंतच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांमध्ये विजयाच्या जवळ येणार्‍या निवडणुकीत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी लढवली होती. ही निवडणूक नको वगळता या मतदारसंघांमध्ये अन्य कोणत्याही नेत्याला फारसे यश मिळालं नाही. या मतदारसंघांमध्ये मराठा समाज आणि धनगर समाजाचे वर्चस्व आहे. बारामती इंदापूर दौंड पुरंदर भोर या परिसरामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाला आपलेसे करण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यशस्वी ठरले होते. त्यावेळी बारामतीच्या सुप्रिया सुळे विरोध यांच्या लढतीमध्ये चमत्कार पाहायला मिळाला होता. हा चमत्कार पुन्हा पाहण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा मोट बांधत आहे.  2014 मध्ये भाजपची लाट होती. त्यात सुप्रिया सुळेंचं मताधिक्य 70 हजारांवरच आलं पूर्वी ते 3-4 लाखांपर्यंत असायचं. त्यानंतर सुप्रियाने मेहनत घेतली आणि 2019 मध्ये ती मार्जिन दीड लाखापर्यंत वाढवली. भाजप जिंकण्याच्या जवळ गेला. पण हरवू नाही शकला. आता असा आत्मविश्वास असण्याची शक्यता आहे की दीड लाखांपर्यंत मताधिक्य खाली आणलंच तर जिंकणंही शक्य आहे. 2009 साली सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता. 

त्यानंतर 2014 ची निवडणूक मोदी लाटेत पार पडली आणि सुप्रिया सुळेंविरोधात रासपच्या महादेव जानकरांचं आव्हान होतं. ही लढत मात्र सहज झाली नाही. फक्त 69,719 मतांनी सुप्रिया सुळेंचा विजय झाला. 2019 च्या निवडणुकीत भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत 1 लाख 55 हजार मतांनी सुळे विजयी झाल्या.

दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल, माधुरी मिसाळ, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली भाजप बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यामुळे काही अंशी राजकीय नेत्यांना बळ आले आहे. हे बळ टिकवण्याचे आव्हान मोठे आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातल्या दोनमध्ये राष्ट्रवादीचे, दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तर दोन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत.
अमेठीच्या जोडीला बारामती उभी करताना दोन्हीमधला फरक लक्षात घेण्याची  गरज असते. अमेठीच्या विकासाकडे स्थानिक नेतृत्वाने दुर्लक्ष केले. राजकारणातील बदलता प्रवाह लक्षात घेऊन मतदारांशी संपर्क ठेवण्यात राहुल गांधी अपयशी ठरले, त्याचा फटका त्यांना बसला. बारामतीची परिस्थिती वेगळी आहे. इथे खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसंपर्क पाहिल्यानंतर लक्षात येते की, देशातील कुणीही खासदार त्यांच्याइतका मतदारसंघासाठी देत नाही. एखादा आमदारही संपर्कात नसतो, तेवढ्या खासदार असूनही सुप्रिया सुळे मतदारांच्या संपर्कात असतात. संसदीय कामकाजासाठी दिल्लीत नसतात, तेव्हा उरलेला जास्तीत जास्त काळ त्या मतदारसंघात असतात. शरद पवार आणि अजित पवार यांच्या दूरदृष्टितून झालेला झालेला बारामतीचा विकास हा अधिकचा भाग आहे.
भारतीय जनता निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी केलेली असताना शरद पवार यांचा अपवाद वगळता विरोधी पक्ष मात्र लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरल्याचे चित्र नाही. प्रकृती ठीक नसताना आणि याही वयात शरद पवार यांच्यात राजकारण करण्याची असणारी ऊर्मी आणि सतत भटकंती करण्याची त्यांच्यात असणारी ऊर्जा विस्मयचकित करणारी आहे. एखादी घटना म्हणा की कोणाचाही प्रतिवाद करायचा असेल तर एखादा व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांत प्रतिक्रिया अपलोड करावी किंवा एखादा ई-मेल माध्यमांना पाठवून दिला की, विरोधी म्हणा की सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची सामाजिक बांधिलकी संपली असल्याच्या सध्याच्या जमान्यातही शरद पवार पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असतात, लोकांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात.  भेटायला गेलेल्या लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची त्यांची चिकाटी अजूनही कायम आहे. तरुणांच्या बैठकीत तर तर साडेतीन-चार तास एकाच जागी बसून त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे शरद पवार हे कदाचित राज्यातील एकमेव नेते असावेत. त्यांच्या मुलीला हरवण्यासाठी नुसते दौरे फायदेशीर ठरणार नाहीत. मतदारसंघात पोलखोल करावा लागेल. बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार हा अतिशय हुशार, समृद्ध असा आहे. त्यामुळे या मतदारसंघात केवळ विकासाचे गाजर चालत नाही. तर लोकांना विकास हवा असतो. जो हा विकास या लोकांना देऊ शकणार आहे तोच या मतदारसंघाचा भावी खासदार असेल.

Friday, August 19, 2022

... लंडनमध्ये जेव्हा रोमांच उभे राहतात

 

(( London calling....in the memories ))

छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उच्चारताच प्रत्येक माणसाच रक्त सळसळतं.  त्यांचे कर्तृत्व एवढ मोठ आहे. की या महान माणसांची दखल जगाला देखील घ्यावी लागली आहे. आपली माणसं कधी कधी आपल्याला नव्याने कळतात आणि आपण त्यांच्या पुन्हा पुन्हा.. प्रेमात पडतो. असाच अनुभव मी मागील दहा दिवसांमध्ये घेतला.

लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट  म्युझियमला भेट दिली. याठिकाणी शिवाजी महाराजांच्या तलवारीला अभिवादन करण्याचे भाग्य मला लाभले. लंडन शहर अनेक बाबींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या दोन गोष्टी पाहण्याची मनाला उत्सुकता लागली.   शिवाजी महाराजांची तलवार आणि लंडन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहते घर पाहताना भारावून गेलो.  एक मिनिट स्थिर न बसणारा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरासमोर तब्बल एक तास शांतपणे बसून राहिलो. तिथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक आमच्या डोक्यामध्ये  घालणारे माझे सर डॉक्टर श्रीराम गडकर व्हिडिओ कॉल केला.

सरांना आंबेडकरांचे घर दाखवलं.  काही वेळासाठी हरवून गेलो होतो. यावेळी एकच मनात विचार आला. सध्याच्या काळामध्ये एवढ्या सुविधा वाढल्या आहेत. आपली भारतीय लोक देखील अन्य देशात स्थिरावत आहेत. मात्र 1921-22 कोणतीही पार्श्वभूमी नसलेला तरुण शिक्षणाची वाट निवडत लंडन गाठतो. तेथे गोऱ्या लोकांच्या शेजारी राहून आपल्या देशाचे भवितव्य या महामानवाला मनापासून वंदन करताना अंगावर शहारे उभा राहतात. तर शिवाजी महाराजांची जगदंब तलवार पाहताना मनातील विचार ठप्प होतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विद्यार्जनाच्या काळात लंडनमधल्या ज्या घरात राहत होते ते प्रत्यक्ष पाहणे हा माझा  भटकंतीचा मुख्य उद्देश होता.  प्रथम लंडनमधल्या पॅिडग्टन स्थानकापर्यंत ट्रेननं जाणं क्रमप्राप्त होतं. त्यापुढे भुयारी रेल्वेनं प्रवास करून मी नॉर्दर्न लाइनवर असलेल्या कॅम्डेन भागातील चॉकफार्म या उत्तर लंडनमधल्या एका टुमदार टय़ूब स्टेशनवर उतरलो. चॉकफार्म स्थानकासमोरचा रस्ता ओलांडून प्रिमरोझ हिल्सच्या दिशेनं जाणारा एक लोखंडी पूल पार करताच उजव्या हाताला असलेला किंग हेन्री रोड दिसला. त्या रस्त्यानं केवळ काही पावलं चालून जाताच तिथं मला हवं असलेलं दहा क्रमांकाचं घर दिमाखात उभं असलेलं दिसलं. घराच्या आसपासचा परिसर सुंदर, शांत, आणि स्वच्छ होता. कोणे एकेकाळी ‘प्रिमरोझ हिल्स’ नावानं ओळखला जाणारा हा परिसर वनराईनं व्यापला होता. राजघराण्यातली मंडळी या भागात शिकारीस येत असत. आज हा परिसर श्रीमंत आणि धीमंतांच्या निवासस्थानांनी व्यापलेला आहे.

दहा क्रमांकाचं घर ही स्वतंत्र इमारत नव्हती. तीन-चार घरं एकमेकांना चिकटून उभी होती. इंग्लंडमध्ये अशी अनेक घरं आहेत. इमारतीनं शंभर पावसाळे पाहिले असूनही ती भक्कमपणे उभी होती. कालपरत्वे आवश्यक डागडुजी झालेली दिसत होती. घराचा दरवाजा उत्तम प्रतीच्या लाकडाचा होता. दरवाजाच्या बाजूला िभतीवर एक गोलाकार तबकडी दिसत होती. तिच्यावर फिकट निळ्या अक्षरात लिहिलं होतं- ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर- १८९१-१९५६. इंडियन क्रूसेडर फॉर सोशल जस्टिस लिव्हड् हिअर इन् १९२१-१९२२.’ पाटी वाचताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.  काहीशा भारावलेल्या मन:स्थितीत मी त्या घराच्या पायरीवर नतमस्तक झालो आणि त्या भारतीय महापुरुषाला नि:शब्दपणे अभिवादन केलं. 

आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही सरस्वतीच्या या उपासकानं लंडनमधल्या कुणाच्यातरी मालकीच्या या घरात निवारा शोधून, अनेकदा अर्धपोटी राहून आपला विद्याभ्यास मोठय़ा चिकाटीनं केला होता. थोड्या प्रमाणात महाराजांचं आणि आंबेडकरांचे वाचन केल्यामुळे अनेक गोष्टींना मनामध्ये उजाळा मिळत होता. गोऱ्या लोकांच्या देशांमध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लायब्ररीच्या समोर डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा फोटो लावला आहे. हा फोटो पाहून प्रत्येक भारतीय तरुणांची छाती दोन इंच फुगल्या शिवाय राहत नाही. राणीच्या म्युझियममध्ये आशियाई देशातील वस्तू  ठेवण्यात आलेल्या आहेत.  या ठिकाणी चकचकणारी महाराजांची तलवार पाहून अंगावर शहारे येतात.

@Digambar Darade
 London

Monday, June 20, 2022

फडणवीसांचाच चमत्कार



दिगंबर दराडे


महाविकासआघाडीतील अस्थिरतेचा पुरेपूर फायदा घेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली  रणनीती यशस्वी ठरवली आहे. भारतीय जनता पार्टीकडे मतांचा कोटा नसताना देखील उमेदवार उभा करून तो निवडून आणून दाखवण्यामध्ये टीम देवेंद्रला यश मिळाले आहे. नेमकी कोणाची मते फुटली यावर माध्यम राजकीय विश्लेषक चर्चा करतीलच.. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत पाठोपाठ दुसऱ्यांदा पराभवाला जाणे हे चिंतन करायला लावणारे आहे.
मी पहिल्यापासून सांगत होतो की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही.


विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभा निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता १३४ मतं घेतली आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. म्हणून आपल्या सदसदविवेक बुद्धीनं आमदार आमच्या पाचव्या उमेदवाराला मत देतील आणि तेच झालं. आमच्या पाचव्या उमेदवाराला एकही मत नव्हतं. पण आमचा पाचवा उमेदवार विजयी झाला. या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने पुढील काळामध्ये महाविकास आघाडीला विचार करावा लागणार आहे.  फडणवीसांनी आखलेलीआखलेली रणनिती पुन्हा एकदा यशस्वी झालेली पहायला मिळाली. 

पुन्हा एकदा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बळ दिलं.  या निकालाने महाराष्ट्रात नवी नांदी पाहायला मिळणार आहे. आज सरकारमधील असंतोष बाहेर आलाय. 
राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आता भाजपाने विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येक दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला असून दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही. 

 विधान परिषदेचे विजयी उमेदवार…
राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते) शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)
भारतीय जनता पार्टी- प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (विजयी) काँग्रेस -चंद्रकांत हंडोरे पराभूत  झाले आहेत. तर भाई जगताप विजयी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यात चुरसीची लढत होईल, असं चित्र दिसत होतं. पण प्रसाद लाड यांनी विजयी बाजी मारली. 

 राज्यसभेत पुरेशी मते नसतानाही भाजपने तीन जागा जिंकल्या. भाजपचे १०६ आमदार आहेत. काही अपक्ष आमदार भाजपबरोबर आहेत. भाजपच्या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली. यावरून भाजपने दहा अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा संपादन केला होता.२००८ आणि २०१० मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊन धक्कादायक निकाल लागले होते. २००८मध्ये काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे यांचा पराभ‌व झाला होता. गणगणे यांचा पराभव हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठा धक्का होता. 

२०१०मध्ये ८३ आमदार असलेल्या काँग्रेसचे तीन उमेदवार निवडून येऊ शकत होते. पण तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी धोका पत्करून चौथा उमेदवार उभा केला होता. विजयासाठी तेव्हा २६१९ पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता होती. काँग्रेसचे चौथे उमेदवार विजय सावंत यांना पहिल्या पसंतीची अवघी १३०० मते मिळाली होती. काँगेसचे तीन व राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या आधारे पुरेश मते नसतानाही काँग्रेसचा चौथा उमेदवार निवडून आला होता. त्या निवडणुकीत विद्यमान परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब आणि भाजपच्या शोभाताई फडणवीस यांच्यात चुरशीची लढत झाली होती. शेवटी २४१५ मते मिळविणारे अनिल परब विजयी झाले तर २२९१ मि‌ळालेल्या भाजपच्या शोभाताई फडणवीस या पराभूत झाल्या होत्या. अपक्ष, मनसे व छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावरच अशोक चव्हाण यांनी  अवघी पाच मते अतिरिक्त असताना चौथी जागा निवडून आणली होती. अशाच प्रकारे या निवडणुकीचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे.

Friday, May 20, 2022

साहस, संयम, संघर्ष म्हणजे ''रोहित''


पुण्यातील एका मित्राच्या घरी  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित (दादा) पाटील यांची भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी दिवंगत नेते रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील उर्फ आबा यांचा रोहित हा मुलगा 

 8 नोव्हेंबर 2014 रोजी आर. आर.पाटील यांचं निधन झालं. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी होती. जिल्हा परिषद सदस्य ते सहा वेळा आमदार, ग्रामविकासमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री ते अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रोहित पाटील यांच्याकडे  पक्षाकडून स्वतंत्र राजकीय जबाबदारी देण्यात  आली आहे.

आबांनी कामातून नावलौकिक मिळवला. सर्वसामान्य माणसाची नाळ आबांच्याबरोबर कायम जोडलेली राहिली. एवढा मोठा वारसा घेऊन रोहित त्याच वाटेने पुढे चालत आहे. शिक्षण चालू असतानाच आपल्या वडिलांचे निधन होणे.  ते दुःख पचवत जनतेचे प्रश्न सोडवत राहणं किती कठीण असते. हे तेच सांगू शकतात. कॉलेज विषयाच्या गप्पा झाल्यानंतर मतदारसंघातील विविध विषयावर चर्चा झाली. मतदारसंघातील विविध प्रश्नांची खडानखडा माहिती रोहितला आहे.  तासगाव परिसरात द्राक्षचे मोठे उत्पादन घेण्यात येते. दहा हजार पेक्षा जास्त हेक्टरवर द्राक्षे पिकवली जातात. या द्राक्षाला आता जगाची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

 आमचा शेतकरी किती मेहनती आहे हे रोहित अतिशय अभिमानाने सांगतो. आबांचे आणि सर्वसामान्य शेतकरी माणसाचं नातं असंच होतं. गावातील प्रत्येक माणसाला आबा आपला माणूस वाटत होते. आबा भाषण करायला आल्यानंतर आपल सगळं दुःख आबाला माहित आहे याची जाणीव भाषण ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाला होत होती. रोहितच देखील सेम आबांसारख आहे.  रोहित बोलत राहावा आणि आपण ऐकत राहावे. अशीच भावना आपली होते. कवठेमहाकाळच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी रोहितवर बापाची पुण्याई असल्याचा आरोप केला होता. निवडणुकीनंतर तुम्हाला माझा बाप आठवलं असे ठणकावून सांगणारा रोहित खूप संयमी आहे. रोहित पाटील सोशल मीडियावर सुद्धा सक्रिया असतात.

 इन्स्टाग्रामवर त्यांचे 83 हजार फॉलोअर्स आहेत. तर ट्वीटरवर त्यांचे 32 हजार फॉलोअर्स आहेत. त्यांचं वय कमी असेल त्यामुळे गेल्यावेळी त्यांना संधी दिली नसेल. रोहित हा लोकांमधील युवा कार्यकर्ता आहे. रोहित जनतेत मिसळणारा कार्यकर्ता आहे.  घराणेशाही नाही तर रोहितच कर्तुत्वच त्याला महाराष्ट्राचा नेता बनवेल.

Saturday, April 23, 2022

महाराष्ट्राच्या समृद्धीचा राजमार्ग

 


महाराष्ट्र विकास महामंडळ राज्य मार्ग (MSRDC) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी अवघ्या दोन अडीच वर्षातच सज्ज झाला. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम यांचा समावेश आहे. विदर्भाला बहुसंख्य ठिकाणी अत्यंत वेगवान प्रवासाचा पर्याय प्रथमच मिळाला. 
नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार हा 210 किमीचा रस्ता तयार झाला. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे दोन मे रोजी उद्घाटन होणे हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. 

अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने संथ गतीने चालवली जातात. कोणताही वन्य प्राणी रस्त्यावर आला तर त्याला कोणतीही हानी होऊ नये असा हेतू  असतो. पण आता देशात असा हाय-स्पीड हायवे बनवला जात आहे, ज्यामध्ये वनक्षेत्राजवळ अंडरपास आणि पूल बांधले जातील. जेणेकरून वन्य प्राणी इकडून तिकडे जाऊ शकतील. भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे.

हा देशातील पहिला सर्वात वेगवान महामार्ग असेल. नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे असे त्याचे सुरुवातीला तांत्रिक नाव होते. ताशी 150 किमी वेगाने वाहने धावू शकतील अशा पद्धतीने ते तयार केले जात आहे. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असे नामकरण झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी करण्याचे आहे. सध्या, दोन शहरांमधील प्रवासाची वेळ  16-18 तासांच्या दरम्यान आहे.

55,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे 70 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. सुमारे 701 किमी लांबीचा आणि 120 मीटर रुंद असलेला हा महामार्ग आहे. जानेवारी 2019 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार हा 210 किलोमीटरचा रस्ता पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजारापर्यंत 210 किमी महामार्ग वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

 त्यानंतर डिसेंबरअखेर नागपूर ते शिर्डी हा 520  किलोमीटरचा महामार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसीला  एक्स्प्रेस वेच्या बाजूने हिरवळ निर्माण करावी त्यामुळे लोकांना प्रवासाचा आनंद घेता येईल, अशा सुचना दिल्या. कलासक्त मनाच्या मुख्यमंत्र्यांची ही सुचना निसर्ग संवर्धनासाठी आणि प्रवाशांना हिरवाईचा अनुभव मिळावा यासाठी महत्त्वाची. 

अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने संथ गतीने चालवली जातात. जेणेकरून कोणताही वन्य प्राणी रस्त्यावर आला तर त्याला कोणतीही हानी होऊ नये. पण आता देशात असा हाय-स्पीड हायवे बनवला जात आहे, ज्यामध्ये वनक्षेत्राजवळ अंडरपास आणि पूल बांधले जातील. जेणेकरून वन्य प्राणी इकडून तिकडे जाऊ शकतील. भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे.

तीन अभयारण्यांकडे जाण्यासाठी सुध्दा या समृद्धी महामार्गावरुन रस्ता मिळेल. यामध्ये तानसा (ठाणे), काटेपूर्णा (अकोला-वाशिम सीमा) आणि कारंजा सोहोळ (वाशिम) यांचा समावेश आहे. याशिवाय या मार्गावर 35 वन्यजीव फोकस क्षेत्रे असतील. त्यापैकी 16 विदर्भात, 16 उत्तर पश्चिम घाटात आणि 3 मराठवाड्यात असतील. ते सुमारे 118 किमीच्या अंतरात असतील. 

महामार्गाच्या बांधकामामुळे वन्य प्राण्यांचे जनजीवनही विस्कळीत झाले. त्यांना पूर्वीसारखे फिरता येत नाही. अशा परिस्थितीत या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भारतीय वन्यजीव संस्थेशी समन्वय केला. या अंतर्गत वन्य प्राण्यांना भीती न वाटता किंवा जीव धोक्यात न घालता रस्त्यावरून फिरता यावे हा उद्देश आहे. या एक्स्प्रेस वेमध्ये 'वाइल्डलाइफ फोकस एरिया'  अंतर्गत पाच वन्यजीव पूल, विदर्भात तीन ओव्हरपास आणि औरंगाबादमध्ये दोन ओव्हरपास बांधले जातील. 

या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्यातील 520 पैकी 360 किमीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याची 'एमएसआरडीसी'ची योजना होती. मात्र, सेलूबाजार ते शिर्डीमधील काही पुलांची कामे अद्याप अपूर्ण राहिली. दोन पॅकेजमधील कंत्राटदार बदलण्याची वेळही 'एमएसआरडीसी'वर आली. परिणामी, पहिल्या टप्प्यात नागपूर ते सेलूबाजारपर्यंतचाच टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर डिसेंबरपर्यंत नागपूर ते शिर्डी असा 520 किमीचा महामार्ग सुरू होईल.

Tuesday, April 19, 2022

कोल्हापूरला सहानुभूतीचे पारडे जड



महाविकास आघाडी सरकार व भाजपातील सत्तासंघर्ष पराकोटीचा झालाय. अशा परिस्थितीत कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीचाही महाराष्ट्रभर गाजावाजा झाला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यांच्या प्रदेश अध्यक्षांच्या, चंद्रकांत पाटलांच्या प्रभावाचा, यश अपयशाचा मुद्दा यामागे होता. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. त्यांच्या पत्नी, भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून देण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे होते. महाविकास आघाडीतील ठळक जाणवणारा समन्वय, जनतेच्या मनातील दिवंगत नेत्याबद्दलची समंजस सहानुभूती, आणि या मतदारसंघात जिवंत असलेला पुरोगामी काॅंग्रेस विचार यामुळे भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. 

विद्यमान आमदाराचे निधन झाले, आणि त्याच्या पत्नीने पतीचा पक्ष सोडत पक्ष बदल करत निवडणूक लढवली, तर यश मिळत नाही, इतके मतदार पक्के असतात, हे यापूर्वी खडकवासला सारख्या काही पोटनिवडणुकांत दिसून आले होते. कोल्हापूर मध्ये ६० टक्के मतदान झाले. त्यात विविध विचारांची मते असली तरी सहानुभूतीचे पारडे जड झाले हे नाकारता येणार नाही. 

 शिवसेनेने गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पुन्हा उमेदवारी न देता काँग्रेसला पाठिंबा दिला. महाविकास आघाडी धर्माचे पालन केले. जाधव यांना ९६१७६ तर कदम यांना ७७,४२६ मते मिळाली. १८,७५० मतांची आघाडी महाविकास आघाडीला मोठे बळ देणारी ठरली. विशेषतः केंद्रीय तपास यंत्रणेचे आघाडीच्या नेत्यांवरचे संशय गडद करणारे, छापे व धाडसत्र ,कारवाईचा विळखा असताना हे यश तिन्ही पक्षांच्या ताकदीमुळे व 'शाहू नगरी'तील जनतेच्या मनातील सहानुभूतीमुळे मिळाले. 

भाजपने या निवडणुकीत हिंदूत्वाचा मुद्दा उचलून धरला होता. तर महाविकास आघाडीने शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार या निवडणुकीत विजय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला होता. महाविकास आघाडीतील सर्वच जेष्ठ नेते तसेच युवा नेतेही प्रचारासाठी कोल्हापुरात होते. तसेच भाजपच्या बाजूने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून होते. 

 प्रचारासाठी बाहेरुन लोक आणले अशी टीका भाजपवर झाली. त्यावर चंद्रकांत पाटलांचे ' आमचे कुटुंब आहे कोणाच्याही घरी लग्न असले तरी आम्ही जातो.' हे उदगार काहीही झाले तरी ही लढत जिंकायची ही जिद्द दाखवून देणारे होते. २०१४ च्या निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार  व महादेवराव महाडिक यांचे नातेवाईक सत्यजित कदम यांना 'आयात' करून रिंगणात आणत भाजपने शर्थीचे प्रयत्न केले. रिपाइं, जनसुराज्य, सदाभाऊ खोत यांचा रयत पक्ष, गोपिचंद पडळकर यांचा समाज, शिवसंग्राम, आवाडे गट, महाडिक गट यांच्या खास मतांवरही भाजपची मदार होती. 

एखाद्या सदस्याचे जर निधन झाले तर त्या जागेवर होणारी निवडणूक बिनविरोध होते, अशी महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. येथे तसे झाले नाही अशी टीका महाविकास आघाडीतील नेते करत होते. तर आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्दयांवर लढली. पूर परिस्थिती, विमानतळ विस्तारीकरण हे विकासाचे मुद्दे असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत होते. 

 पहिल्या फेरीपासून जयश्री पाटील यांना मिळालेली आघाडी पाहून अखेरीस पाटील यांनी पराभव मान्य केला. भाजपचे दोन खासदार होते, आता भारतभर आमचा पक्ष पसरला हे समाधान ( पराभव झाल्यानंतर भाजपकडून नेहमी व्यक्त होणारे) देखील व्यक्त केले.) 
 विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सहानुभूतीमुळे जयश्री जाधव यांचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

 कोल्हापूरचे पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील  'किंगमेकर' ठरले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सेनेच्या नेत्यांना सोबत घेत चंद्रकांत पाटील यांना व महाडिक परिवाराला  शह दिला. कोल्हापुरात महाविकास आघाडीत मोठा समन्वय असल्याने हा विजय शक्य झाला, असे सतेज पाटलांचे म्हणणे आहे. 

सतेज पाटील  यांनी रचलेल्या व्यूहरचनेप्रमाणे आघाडीचे नेते उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नशील राहिले. तर हिंदुत्व, शिवसेनेचे संपवण्याचे उद्धव ठाकरेंचे प्रयत्न आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्दा,यामुळे  भाजपाने निवडणूकीच्या प्रचार धार्मिक  मुद्याच्या वळणावर पोहचवला.

सतेज पाटलांची विजयानंतरची प्रतिक्रिया भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली हे मान्य करणारी आहे. ते म्हणतात, कोल्हापूर शहर पुरोगामी आहे हे दाखवून देण्याचे काम इथल्या नागरिकांनी केले. भाजपने विखारी प्रचार केला. ज्या प्रभागातून सर्वाधिक मतांची अपेक्षा होती तिथून आम्हाला कमी प्रतिसाद मिळाला. यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करु. भाजपच्या मताचा टक्का वाढलेला सकृतदर्शनी दिसत असले तरी त्यात पुढे सातत्य राहणार नाही.

Friday, April 8, 2022

दिलवाले शहर का 'दिल भरा खाना'



प्रत्येक शहराची एक खाण्याची संस्कृती असते. तशी संस्कृती दिल्लीची देखील आहे. यमुनेच्या पाण्याची चव खाद्यसंस्कृती मध्ये पाहायला मिळते. दिल्लीमध्ये अनेक वेळा येणं-जाणं सुरू असतं. देशाची राजधानी दिल्ली आपले वेगळेपण सदैव असल्याचे चित्र पाहायला मिळते. महाराष्ट्र सदनच्या थाळी पासून ते कॅनॉट प्लेसच्या Sandoz पर्यंत, National पासून ते राजेंद्र दा धाबा ते बंगाली मार्केटपर्यंत, प्रेम ढाबा या ढाब्याचे बटर चिकन खूप प्रसिध्द आहे.

 इथले जेवण चविष्ट तसेच स्वस्त आहे आणि तुम्हाला इथे बसून खाण्याची सोयही मिळेल. विशेष बाब म्हणजे ते नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच आहे.राजिंदर दा ढाबा हे दिल्लीतील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक मानले जाते. त्याची नॉनव्हेज टेस्ट फक्त दिल्लीतच नाही तर भारताच्या अनेक भागात प्रसिद्ध आहे. तुम्हाला इथले बटर चिकन आवडेल. यासोबतच तुम्ही या ठिकाणी चिकन आणि मटणाचे इतर चविष्ट पदार्थ देखील ट्राय करू शकता.

गुलाटी रेस्टॉरंट हे दिल्लीच्या पंडारा रोड मार्केटमध्ये असलेल्या गुलाटी रेस्टॉरंटच्या बटर चिकनची गोष्ट खास आहे. असं म्हणतात की हे दुकान 1959 पासून सुरू आहे. येथील बटर चिकन खास असते. दरियागंज नाॅनव्हेडसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे अशी अनेक रेस्टॉरंट्स आहेत, जिथे तुम्ही बटर चिकनचा आस्वाद घेऊ शकता. हे ठिकाण राजेशाही थाटासाठीही ओळखले जाते.

दिल्लीच्या राजौरी गार्डन भागात 'ढाबा' हे एक खास रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे बटर चिकन आणि गार्लिक नॉन-टेस्ट देसी स्टाईलमध्ये ट्राय करू शकता. इथलं जेवण थोडं महाग आहे, पण चवीच्या बाबतीत या रेस्टॉरंट जोड नाही.
दिल्ली हाटमध्ये साबुदाणा वडा छान आहे, पण सोबत लसणीची चटणी देतात. बटाटेवडा पण ओके. बाकी थालपीठ, भाकरी, झुणका वैगरे तिथे खावं वाटलं नाही. कोकम सरबत मिळतं तिथे, ते मात्र ब्येस्ट.  बाकी आंध्राभवन मधले जेवण छान असते. व्हेज थाली मस्त आहे तिथली.. सोबत मेतकुटाचा भाऊ शोभेल असा एक पदार्थ येतो, 
नॉन व्हेज खात असाल तर तिथली चिकन चेट्टिनाड ही डीश खाच. जेवण झाल्यावर मस्त पान वैगरे मिळते. गुजराथी थाळीसाठी राजधानी, कॅनॉट प्लेस अन गुडगावमध्ये आहे..

 बहुतेक नोयडा मध्ये पण असेल. चांगलं जेवण अन चांगली सर्विस... अशीच एक सुरुची नावाची जागा आहे करोलबागमध्ये, तिथे गुजराथी अन राजस्थानी जेवण मिळतं... एकदम छान चव.. आहे. याव्यतिरिक्त रात्री बेरात्री उशिरा जेवायचं असेल तर पंडारा रोड चांगली जागा आहे. कढी चावल / राजमा चावल साठी कॅनॉट प्लेसवर रोडवर काके का ढाबा टाइपच्या एक्-दोन जागा आहेत. त्या पण चांगल्या आहेत.

दिगंबर दराडे
दिल्ली 7 एप्रिल 2022

Sunday, March 20, 2022

उजनीच्या भेटीला ''दो परदेशी''



मुबलक पाणी, जमिनीची सुपीकता यामुळे  उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेती बहरली आहे. मुख्य म्हणजे उजनी धरण व या धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी आणि पक्षी पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. यामुळे या क्षेत्रात अनेक कृषि पर्यटन केंद्र विकसित होत आहेत. आपण जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जातो. त्यावेळी आपल्या देशा विषयी आणखी अस्मिता जागी होते.

 डब्लिंगचे मित्र काहील यांच्याबरोबर रविवारी सकाळी उजनी चे पर्यटन केले. लहानपणापासूनच ...उजनी पहात आल्यामुळे फारसं आकर्षण मला असण्याचे काही कारण नाही. मात्र परदेशी पाहुण्यांना त्या ठिकाणी परदेशी पक्ष्यांचे दर्शन झाल्यामुळे त्यांना मनापासून आनंद झाला. तो आनंद पाहण्यासारखा होता. शाळेतील मित्र संतोष देवकाते यांनी या ठिकाणी उजनी या नावाने हॉटेल सुरू केले आहे. उजनीची भ्रमंती झाल्यावर उजनीतील मासे उजनीमध्ये खाण्यामध्ये वेगळी मजा आली.

 बहुतांश पक्षी रशियन सैबेरिया, काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या भीमानगर (ता. माढा) या गावाजवळ आहे. या धरणाचे पाणी पुढे कर्नाटक राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. उजनी हे महाराष्ट्रातील जायकवाडी धरणानंतर सर्वात मोठे धरण आहे. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अर्थकारण व राजकारण यावर अवलंबून आहे. 

उजनी धरणाच्या माध्यमातून सुमारे २५००० कोटी रूपयाची उलाढाल होते. पर्यटनाच्या बाबतीत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथे दरवर्षी आवर्जून येणारे देश विदेशी हजारो पक्षी. यामुळे उजनी बॅकवॉटर जलाशय हा पाणपक्ष्यांसाठी देशात प्रसिद्ध पावत आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून या बॅक वॉटरच्या क्षेत्रात काही पर्यटन केंद्र विकसीत होत आहेत. 

उजनी धरण हे पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यास वरदायिनी ठरले असून या धरणावर परिसराचे विकास, अर्थ तसेच राजकारण अवलंबून आहे. धरणातील पाण्यावर ४४ सहकारी व खाजगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपूरक उद्योग अवलंबून असून, दरवर्षी ३० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे हा परिसर सुजलाम सुफलाम बनला असून कृषि धवल औद्योगिक क्रांती झाली आहे.

 धरण क्षेत्र संरक्षित ठेवून इतर परिसर पर्यटन केंद्रम्हणून नियोजनबद्ध पद्धतीने विकसित करणे गरजेचे आहे. धरणाला लागून पुणे सोलापूर, जलाशयास समांतर टेम्भुर्णी ते नगर राष्ट्रीय महामार्ग, दक्षिण व उत्तर भारताला जोडणारी रेल्वे वाहतूक जेऊर, कुर्डुवाडी व भिगवण स्टेशन मार्गे आहे.  पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर, जेजुरी, मोरगाव, दहिगाव, नरसिंहपूर या तिर्थक्षेत्रास दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. उजनी फुगवट्यावर क्रौंच, रोहित, बदके आदी ३५० प्रकारचे पक्षी, चिलापी, रोहू, कटला, वाम, मरळ आदी १५ प्रकारचे मासे यासह विविध पक्ष्यांचे वास्तव्य असते. यातील बहुतांश पक्षी रशियन सैबेरिया, काही पक्षी हिमालय, पूर्व युरोप आणि आफ्रिकेतून येतात.

उजनी माश्यांचा ब्रँड महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक व पश्चिम बंगाल येथे निर्माण झाला असून भिगवण, इंदापूर ही ठिकाणे मत्स्य केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. उजनी पट्ट्यात मत्स्य अभ्यास,पक्षी निरीक्षण, वनस्पती अभ्यास केंद्र, प्राणी संग्रहालय, खाद्यमॉल उभारून पर्यटकांना आकर्षित करणे शक्य असून त्यातून रोजगार निर्मिती होऊन अर्थकारण देखील मजबूत होऊ शकते. मात्र परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्या शेती व्यवसायास धक्का न लावता पर्यटनकेंद्र विकसितझाल्यास देश परदेशातील पर्यटक या परिसराला भेटी देतील मात्र त्यासाठी नेत्यांची जबरदस्त इच्छा शक्ती हवी.

स्थानिकांना रोजगार मिळेल... उजनी जलाशयावर वर्षभर वेगवेगळ्या खंडातून पक्षी येत असतात. यामुळेदेखील पर्यटन व्यवसाय वाढेल, तसेच राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरण    असल्याने हॉटेलिंग व्यवसायही निसर्गरम्य वातावरणात नावारूपाला येईल. रोजगारात वाढ होईल व संबंधित विभागाला पर्यटनाच्या माध्यमातून महसूल गोळा होईल, असे उजनी हॉटेलचे मालक संतोष देवकाते यांनी सांगितले यांनी सांगितले

. तर रोजगारनिर्मिती व्हावी, गर्दी वाढावी, खाजगी उद्योग आणि रोजगार यांचा ताळमेळ घालून उजनी परिसराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी उजनी धरणावरील पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर डेव्हलप करणे गरजेचे बोट व्यवसायिक सचिन देवकाते यांनी सांगितले.

दिगंबर दराडे
पुणे  21मार्च 2022

Friday, March 18, 2022

राजस्थानचा "चंग"

 

राजस्थानच्या होळीमध्ये चंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा चंग वाजवत राजस्थानी बांधव होळीचा सण साजरा करतात. प्रामुख्याने यामध्ये चंग वाजवत वाजवत गाण्याच्या तालावर सर्वजण गातात. धुलीवंदनाच्या दिवशी पुण्यातील राजस्थानी बांधवांनी आणि माझे मित्र मगराज राठी यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  महाराष्ट्रात हलगी वाजवली जाते. हलगी छोटी असते. चंग मात्र मोठा असतो.

 हा चंग सर्वजण एका तालात वाजवतात.  प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील संस्कृती समजून घेताना एक वेगळी मजा येते. महाशिवरात्री नंतर हे चंग बाजारात दिसायला लागतात. बाजारातून, गली-मोहल्लों मे चंगच्या थापेवर  होळीची गाणी गात महिला आणि पुरुष नृत्य करत असतात.

होळी हा रंग आणि हास्याचा स जेण आहे.  हा भारतातील एक प्रमुख आणि प्रसिद्ध सण आहे, जो आज जगभरात साजरा केला जात आहे. हा सण, ज्याला रंगांचा उत्सव म्हणतात, पारंपारिकपणे दोन दिवस साजरा केला जातो.  तो प्रामुख्याने भारत आणि नेपाळमध्ये साजरा केला जातो.  हा सण इतर अनेक देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो ज्यामध्ये अल्पसंख्याक हिंदू लोक देखील राहतात.  पहिल्या दिवशी होळी पेटवली जाते, ज्याला होलिका दहन देखील म्हणतात.  दुस-या दिवशी, ज्याला मुख्यतः धुलेंडी आणि धुरडी, धुरखेल किंवा धुलिवंदन या नावाने ओळखले जाते.

लोक एकमेकांवर रंग, अबीर-गुलाल इत्यादी फेकतात, ढोल वाजवून होळीची गाणी गायली जातात आणि लोक घरोघरी रंगतात- दार. आहे.  असे मानले जाते की होळीच्या दिवशी लोक जुने कटुता विसरतात आणि मिठी मारतात आणि पुन्हा मित्र बनतात.  एकमेकांना रंगवण्याची आणि गाणी वाजवण्याची फेरी दुपारपर्यंत चालते.  यानंतर आंघोळ करून, विश्रांती घेतल्यानंतर, नवीन कपडे परिधान करून, लोक संध्याकाळी एकमेकांच्या घरी जातात, मिठी मारतात आणि मिठाई खातात.

Thursday, March 17, 2022

द काश्मिर फाईल्स



काश्मिर फाईल्स या चित्रपटाबद्दल दिवसाला सरासरी पाच पोस्ट तर नक्की वाचल्या असतील. खरंतर विवेक रंजन अग्निहोत्रीचा बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम आणि द ताश्कंत फाईल्स बघितल्यानंतर बॉलिवूडच्या चौकटी लांघणारा हा दिग्दर्शक आहे, आणि दिग्दर्शकाच्याही पलीकडे त्याचा काहीतरी वेगळा दृष्टिकोन आहे, सिनेमा हे माध्यम हाताळण्याची त्याची हातोटी वेगळी आहे याची खात्री पटली होती आणि त्यामुळेच काश्मिर फाईल्स या चित्रपटाबद्दल कुतूहल होतं. 

भ्रमंती हा आपला आवडीचा छंद असल्याने १५ मे २०१८ रोजी काश्मीर फिरण्याचा योग आला. निसर्ग संपन्न असलेला हा परिसर प्रत्येकालाच  खुणवतो. इथला इतिहास अंगावर शहारे आणतो. काश्मीर ही सर्वांची अस्मिता आहे.  अन्य राज्यांच्या तुलनेत काश्मीर हे शब्द जरी ऐकले आपलं देश प्रेम उफाळून येते. यावेळी काश्मीर मधील मराठी प्रशासकीय सेवेतील अधिकारी सागर डोईफोडे यांच्या घरी जाण्याचा योग आला. त्यांनी त्या ठिकाणी केलेला पाहुणचार आजही स्मरणात आहे. 


त्यावेळी आपला मराठी प्रशासकीय अधिकारी काश्मीरकडे कोणत्या नजरेने पाहतात.. हे पत्रकार म्हणून निरीक्षण केले. मला निसर्गसंपन्न वाटणारा काश्मीर त्यादिवशी तेथील विकास, इतिहास, रूढी परंपरा, तेथील परिस्थिती पाहता वेगळा समोर आला. भारतीय सैनिकांनी दिलेला कडेकोट बंदोबस्त तेथील इतिहासात आपल्याला घेऊन जातो.  नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या द काश्मीर फायल्सने पुन्हा एकदा इतिहासाकडे नेले. गुलमर्गच्या व्हॅलीमध्ये घोड्यावर बसून जात असताना घोड्याचा पाय घसरला. 

मी एका साईटला पडलो. खूप घाबरलो होतो. मात्र सुदैवाने कोणतीही वाईट घटना घडली नाही. आजही ती घटना आठवली तरी अंगावर शहारे येतात. आम्ही घोड्यावर बसून बर्फवृष्टी पाहायला आम्ही चाललो होतो.  त्यानंतर  काही दिवसांनी गुलमर्गमधील याच महादेवाच्या मंदिरात आपले पाच आमदार जाणार होते.  श्रीनगर रस्त्यावरून  जाताना बाॅम्बस्फोट झाला. सुदैवाने सर्वजण बचावले. या मंदिरात जय जय शिवशंकर या गाण्याचे शुटिंग झाले आहे.

१९/२० जानेवारी १९९० उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली. काश्मीर खोऱ्यातल्या हिंदूंचे अस्तित्व पुसण्याचा आणि पुरोगामी फाईलींमधे बंद करून टाकलेला हा रक्तरंजित इतिहास ,आज बत्तीस वर्षांनी देशासमोर ठेवला गेलाय. ज्ञानाची गंगोत्री असलेलं, विद्येचं शक्तिपीठ असलेलं काश्मीर वामपंथी इकोसिस्टीमने पद्धतशीरपणे हिरवं रंगवून देशापासून तोडलेलं राहील याची काळजी कशी घेतली हे चित्रपट पाहताना जाणवतं आणि प्रचंड राग राग होतो. “फ्री कश्मीर”, “आजादी”, “अफझल हम शर्मिंदा है ” म्हणणारी लालहिरवी पिलावळ कशी पोसली जाते हेही या चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय.

या दहशतवादी प्रयत्नांना पाठिंबा देणारी इनव्हिजीबल आर्मी म्हणजे लुटीयन मिडीया, भारताच्या सेनेचं मनोबल खच्ची करणारी तेव्हाची शासनसंस्था, किडामुंग्यांपेक्षाही वाइट पद्धतीने मारले गेलेले काश्मीरी पंडित मोठ्या पडद्यावर बघताना अंगाचा थरकाप उडतो आणि डोळ्यातून पाणी ओघळतं. वर्षानुवर्ष मागच्या सरकारांनी विविध फाईल्समधे दडवलेलं हे भीषण सत्य, वास्तवात घडून गेलेलं क्रौर्य आपल्यासमोर ठेवताना अग्निहोत्रीने ताश्कंद फाईल्सप्रमाणेच फुलप्रुफ काम केलंय. 

आज जेएनयू सारख्या संस्थांमधून देशविरोधी विखार,फुत्कार कसे जोपासले जातात आणि तथाकथित बुद्धिवादी प्राध्यापक मंडळी त्याला खतपाणी कशी घालतात हेही ठळकपणे जाणवतं. वर्षानुवर्षे याच तथाकथित उदारमतवादी बुद्धिवादी लोकांनी काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल न बोलणं अथवा खोट्या कथा पसरवण्याचं काम केलं. म्हणूनच “जब तक सच जुते पहनता है, तब तक झूट नंगे पाँव गाव घुम आता है” याचा प्रत्यय आपल्याला काश्मीर प्रकरणात आलेला आहे.

एकीकडे काश्मिर ही एक जखम आहे म्हणत असताना तेच काश्मिर पृथ्वीवरचं नंदनवन आहे, स्वर्ग आहे, सौंदर्य आणि निसर्गाच्या चमत्कृतींचा भव्य असा देखावा आहे हे ही ऐकत मी मोठी झाले. त्यामुळे पहिल्यापासूनच काश्मिर बद्दल एक अगम्य गूढ आणि अनामिक ओढ अशा दोन्ही भावना मनात होत्या. 

 दिगंबर दराडे
18 मार्च  2022
पुणे

Thursday, March 10, 2022

असा जिंकला 'आम आदमी' !



आप पंजाबमध्येएवढा मोठा विजय मिळवेलं असं कुणालाही वाटलं नव्हतं पण, गेल्या सहा महिन्यात आम आदमी पक्षानं असं काय केलं की, पंजाब करांनी त्यांच्या हाती सत्ता दिली. काय आहे आम आदमी पार्टीचा विजयी फॉर्म्युला ?,याबद्दलचा हा रिपोर्ट

 पंजाबमधील 117 मतदार संघांपैकी 90 जागांवर आपने बाजी मारली आहे. प्रमुख्याने दिल्लीमध्ये केलेली आपने कामगिरी संपूर्ण देश ओळखत आहे. प्रामुख्याने जाहीरनाम्यामध्ये मोफत वीज शिक्षण आरोग्य या बाबींवर भर देण्यात आला होता. प्रचारामध्ये विकासाच्या मुद्द्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. केजरीवाल यांच्यावर ती केलेला देशद्रोहाचा आरोप विरोधकांवर बूमरँग झाल्याचे पाहायला मिळाले. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मुख्यमंत्रीपदाचे असलेले उमेदवार भगवत सिंग मान असा देखील करिश्मा पाहायला मिळाला.

 पंजाबमधील जनतेने यावेळी आपवर विश्वास ठेवत पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधील या विजयाचे चित्र पाहता आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार देखील मानले आहेत.

पंजाब विधानसभा निवडणूक निकालामध्ये  आम आदमी पक्षाची जादू पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये आपच्या झाडूने काँग्रेसची सफाई केली आहे. निवडणूक निकालामध्ये आपने अनेक जागांवर बाजी मारत काँग्रेसचा पराभव केला आहे. त्यामुळे पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील 117 मतदार संघांपैकी 92 जागांवर आतापर्यंत आपने बाजी मारली आहे. 

पंजाबमधील जनतेने यावेळी आपवर विश्वास ठेवत पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधील या विजयाचे चित्र पाहता आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहेपंजाबमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन आम आदमी पार्टीने सर्व पक्षांना मागे टाकत मुसंडी मारली आहे. आम आदमी पार्टी 92 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेस फक्त 18 जागांवर, अकाली दल 4 जागांवर, भाजप 2 जागांवर आणि अन्य 1 जागेवर आघाडीवर आहे.

 ही निवडणूक काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि भाजपसाठी खूपच चुरशीची आहे. पण सध्या हाती आलेल्या निकालावरुन आपच्या झाडूने इतर सर्वच पक्षांची साफसफाई केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पंजाबमधील विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये 'या क्रांतीसाठी पंजाबमधील जनतेचे खूप खूप आभार.' असे लिहिले आहे.

Wednesday, March 9, 2022

...अब योगी योगी कहना है



 ग्राउंड रिपोर्ट
 दिगंबर दराडे


हम निकल पड़े हैं प्रण करके
अपना तन-मन अर्पण करके
जिद है एक सूर्य उगाना है
अम्बर से ऊँचा जाना है
एक भारत नया बनाना है ..



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरील ट्विट करून यूपीकरांना चुचकारले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद  योगींच्या पाठीशी असल्याने त्यांनी निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. राम मंदिरापासून ते गंगेच्या घाटापर्यंत.. गंगेच्या घाटापासून ते वाराणसी एअरपोर्ट पर्यंत.. घराणेशाहीला विरोध करत.. हिंदुत्वाचा नारा देत.. विकास म्हणजे मोदी..आणि मोदी म्हणजेच विकास.. असे आराखडे या निवडणुकीमध्ये आखण्यात आले. पहिल्या असले पासूनच मोदींनी उत्तर प्रदेशसाठी डबल इंजिनचे सरकार द्या असे आव्हान येथील जनतेला केले होते. या आव्हानाला साथ देत यूपी मे रहना है तो योगी योगी कहना है

 हा नारा खरा केल्याचे आज स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही प्रयागराज, वाराणसी, अयोध्या या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट मांडला. सर्वात प्रथम मोदी यांची काशी विश्वेश्वराबद्दल असलेली श्रद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. हिंदुत्व आणि काशी यांची सांगड घालत मोदीने ही निवडणूक आपल्या हातात ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवस दिवस सभा करत योगी आणि मोदींनी संपूर्ण 75 जिल्ह्यांचा उत्तर प्रदेश पिंजून काढला. संध्याकाळच्या सभेच्या वेळी मोदींना बोलताना प्रचंड त्रास होत असताना देखील त्यांनी आपली पक्कड कमी होऊ दिली नाही. 

योगी आणि मोदींची समय सूचकता या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली. जेव्हा मोदीनी वाराणसीमधून निवडणूक लढवली. त्यावेळी मोदींनी गंगा मा ने बुलाया है.. अशी आर्त हाक यूपीकरांना टाकली होती. या हाकेला लोकांनी मनापासून साथ दिली होती. यावेळी देखील योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या पद्धतीने ही निवडणूक हाताळली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर योगी आदित्यनाथ गोरखपुरसे संसद रहायचे.   योगी आदित्यनाथ यांनी गेल्या ५ वर्षात यूपीमध्ये केले. योगी आदित्यनाथ का मूल नाव अजय सिंह बिष्ट आहे.  ते गोरखपुर येथील प्रसिद्ध गोरखनाथ मंदिराचे महंत आहेत.  लोकप्रियतेच्या बाबतीत भारतात योगी आदित्यनाथ यांचा देशातील पहिल्या पाच नेत्यांचा समावेश आहे. ही निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचा दुसरा क्रमांक लागणार आहे.

Monday, March 7, 2022

योगी येणार पण जागा घटणार



ग्राउंड रिपोर्ट
दिगंबर दराडे

उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा सरकार स्थापन करतील. मात्र मागच्या वेळी आलेल्या तीनशे जागांचा आकडा यावेळी त्यांना पार करता येणार नाही. तर सपाची मजल दीडशे जागपर्यंत जाईल. या ठिकाणी मात्र एमआयएम फॅक्टर फारसा चालणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.  मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे.





युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.यूपी विधानसभेत एकूण 403 जागा आहेत आणि बहुमतासाठी 202 जागा आवश्यक आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ७ टप्पे करण्यात आले होते. १०, १४ , 20 , 23 , 27 फेब्रुवारी आणि 03 मार्च रोजी मतदान पार पडलं होते.

भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे, पण त्यांना किमान 80 ते 90 जागांचे नुकसान होत आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व त्यांचा पक्ष 300 चा आकडा पार करणार असल्याचा दावा करत आहेत. मात्र ती परिस्थिती या निवडणुकीत पहायला मिळणार नाही. उत्तर प्रदेशचं युद्ध कोण जिंकतं हे लवकरच स्पष्ट होईल. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा कमळ फुलण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्य भाजपाला 223-228 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर समाजवादी पक्षाला 138 - 157 जागा मिळतील. उत्तर प्रदेशमध्ये बसपाला 5 - 11 तर काँग्रेसला 4 - 7 जागांवर समाधान मानावं लागणार आहे.

 एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी सरकार सत्तेत येण्याची चिन्ह आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जोर लावला होता.
प्रचारसभेत जोरदार आरोप प्रत्योराप पाहिला मिळाले. भाजप आणि सपात चुरशीची लढत झाली. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजप पहिल्या स्थानावर असला तरी गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 403 जागांपैकी तब्बल 312 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. त्यावेळी मोदी लाटेचा फायदा उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला झाल्याचं बोललं जात आहे.

ऐकेकाळी पुर्ण उत्तर प्रदेशवर आपली एकहाती सत्ता गाजवणारा मायावतींच्या  बहुजन समाजवादी पक्षला  मात्र जास्त जागा मिळवू शकत नसल्याचं चित्र आहे.  तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी  यांच्या नेतृत्वात स्त्रीयांसाठी अनेक आश्वासन दिली तरी देखील त्यांना युपीतील जनतेन काँग्रेसला जास्त पसंती दिली नसल्याचं चित्र समोर येत आहे.





Saturday, March 5, 2022

मैं झुकेगा नही...



युक्रेन हा अतिशय छोटा देश आहे. मात्र येथील नागरिकांच्या अंगामध्ये असलेला चिवटपणा खूप वेगळा आहे. युक्रेनला भेट दिल्यानंतर तेथील संस्कृती, शिक्षणाबद्दलची जागृती आणि आपल्या देशाबद्दलची अस्मिता खूप वेगळी आहे हे दिसून येते. अन्य देशांच्या तुलनेत युक्रेनमधील कायदे देखील खूप कडक आहेत.  प्रवासाच्या दरम्यान घडलेला एक किस्सा आपणास सांगतो.   कीवच्या एअरपोर्टला आम्ही उतरल्यानंतर परदेश नागरिक फोटो काढत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.  कीवचा एअरपोर्ट खुप सुंदर आहे. याठिकाणी प्रत्येकाचाच फोटो काढण्याचा मोह होतो. मात्र परदेशी नागरिक फोटो काढत असल्याचे युक्रेन पोलिसाला आवडले नाही.  

फोटो काढत असल्याचे पाहून पोलीस परदेशी नागरिकांपर्यंत आले. का काढले असा त्यांनी प्रश्न विचारला. त्या पोलिस अधिकाऱ्याला ते आवडलं नव्हते. त्यांच्या कायदात देखील ते बसत नव्हतं. पोलिसांनी एअरपोर्टवर एक रिंगण आखले  त्यामध्ये परदेशी नागरिकांना बसवण्यात आले. त्या ठिकाणाहूनच युक्रेन पोलिसांनी त्या परदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं. त्यावेळी त्या नागरिकांनी खूप विनंती केली. त्यांच्या देशातीलमध्ये असलेल्या नागरिकांनी देखील त्यांना युक्रेनमध्ये  घेण्याचा प्रयत्न केला. 

मात्र पोलीस काही झुकले नाहीत. ते त्यांच्या मतावर ठाम राहिले. हा प्रसंग माझ्या डोळ्यांनी युक्रेनमध्ये पाहत असताना अंगावर शहारे आले. तेव्हापासून कधीही कोणत्या एअरपोर्टवर फोटो न काढण्याची शिकवण घेतली. त्याच वेळी युक्रेनवाले झुकनेवाले मे नही है हे स्पष्टपणे जाणवले. आणि त्याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धामध्ये दिसून येत आहे. युक्रेनचे राष्ट्रपती त्यांनी देखील आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. छोटा देश रशियावर तुटून पडताना दिसत आहेत हे त्यांचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की.... त्यांचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियन शहरात क्रिव्ही रिह येथे झाला.  

हे शहर सध्या युक्रेनचा भाग आहे.  झेलेन्स्कीचे पालक ज्यू होते.  लहानपणी, झेलेन्स्कीचे कुटुंब मंगोलियातील एर्डेनेट येथे राहायला गेले.  या कारणास्तव व्होलोडिमिर झेलेन्स्कीचे प्रारंभिक शिक्षण मंगोलियामध्ये झाले.  असे असूनही त्याने युक्रेनियन आणि रशियन भाषेवर आपली पकड कायम ठेवली.  मोठा झाल्यावर, तो युक्रेनला परतला आणि 1995 मध्ये कीव नॅशनल इकॉनॉमिक युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी घेतली.  असे असूनही, झेलेन्स्कीने कॉमेडी क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली.  त्याच्या अभ्यासादरम्यान, झेलेन्स्कीला थिएटरचे खूप आकर्षण होते. 

 1997 मध्ये तो परफॉर्मन्स ग्रुप, क्वार्टल 95, KVN च्या फिल्ममध्ये दिसला. सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर वोलोदिमीर जेलेंस्की यांना इजराइलमध्ये अभ्यास करण्याकरता स्कॉलरशिप मिळाली परंतु वडिलांची परवानगी न मिळाल्या कारणामुळे वोलोदिमीर यांनी कीव येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 2000 मध्ये कीव नेशनल इकोनॉमिक यूनिवर्सिटीद्वारे लॉची डिग्री प्राप्त करून आपले ग्रेजुएशन पूर्ण केले. 73 % मतं मिळवून बनले राष्‍ट्रपती : 2018 मध्ये वोलोदिमीर यांनी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. वोलोदिमीर यांनी ‘सर्वेंट ऑफ द पीपल पार्टी’ बनवली.या पक्षातून त्यांनी राष्‍ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली. निवडणुकीत 73 % वोट मिळवून त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि देशाचे राष्ट्रपती पद भूषविले. रशियाविरुद्ध लढत असताना. ते खूप भावूक झाले. मात्र स्वतः शस्त्र हातात घेऊन आपल्या देशासाठी आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी लढण्याची तयारी केली.

Digambar Darade  
(3 मार्च २०२२)
Pune 
https://www.blogger.com › ...
User Profile: Digambar Darade - Blogger.com

Tuesday, March 1, 2022

हरहरगंगे... प्रयागराजमध्ये योगीराजला झुकते माप


सोळाव्या शतकातील अलाहाबाद आता प्रयागराज बनले आहे. पण नाव बदलल्याने आणखी काही बदल झाला आहे का? कामाच्या जोरावर भाजप पुनरागमन करणार की समाजवादी पक्ष आपल्या सायकलचा वेग वाढवणार, हे या निवडणुकीतून पुढे येणार आहे. संगम येथील हनुमानजींच्या मंदिरात लाखो लोक सतत दर्शनासाठी येतात. त्यामुळे या शहराची वेगळी ओळख आहे. नुकत्याच झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भविष्याची फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धाळूंवर राज्यातील तरुणांचा विश्वास बसू शकत नाही. प्रयागराज आणि प्रतापगडच्या 19 विधानसभा जागांच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या बैठकीत फाफामाऊच्या बेला कचरमध्ये पंतप्रधानांनी योगी-केशव जोडीच्या कार्याचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, आशावादींच्या भविष्याशी खेळणाऱ्यांपासून यूपीला वाचवले पाहिजे. राज्यातील युवक वाचवा. 

 प्रयागराजमध्ये पुढारीच्या टीमने धनंजयसिंग ठाकूर यांना विचारले, शिक्षण रोजगार शेती हे जरी असले तरी मोदीराजच प्रयागराजमध्ये येईल. तुमच्यासाठी निवडणुकीतील मुद्दे काय असतील, यावेळी सुनील गुप्ता यांनी सांगितले, शिक्षण, सिंचन, रोजगार हे यावेळचे प्रश्न आहेत. तर. ..निसाद केवट, म्हणाले यावेळी योगी येतील आणि तेच मुख्यमंत्री होतील, मग चांगले होईल. निवडणुकीत महिलांचा मुद्दा काय असेल? यावर एक व्यक्ती म्हणाली, महिलांचा मुद्दा असा आहे की योगीजी पुन्हा येणार आहेत. असा प्रश्न विचारला असता? कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार, ही सुरक्षा आहे का, महागाई आहे का? उदय ठाकूर म्हणाले, महिलांच्या सुरक्षेचा देखील प्रश्‍न महत्त्वाचा आहे. समाजवादी पक्षाची सत्ता येणार आहे. बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, नोकऱ्या हरवल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. नुकतीच गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या प्रयागराज या ठिकाणी पार पडली. गंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक आहे. 

गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे स्थान असलेल्या या शहराला यापुढे 'प्रयागराज' म्हणून ओळखले जाणार आहे. 'प्रयाग' हे या शहराचे फार जुने नाव. मुघल सम्राट अकबराने ते बदलून 'अलाहाबाद' केले. अलाहाबादी संस्कृतीचा या देशावर प्रभाव आहे. सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्या आहे, तसाच तो राजकीयही आहे. एकूण पंधरापैकी सात पंतप्रधानांचे अलाहाबादशी गहिरे नाते राहिले आहे. या शहराच्या नामबदलाचा प्रस्ताव २५ वर्षे जुना आहे. मात्र निर्णय होत नव्हता. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मागे लावून हा निर्णय केंद्राकडून मंजूर करवून घेतला. मनोरंजक लढत उत्तर प्रदेशमध्ये आहे, जिथे काँग्रेस आणि बसपा अस्तित्वासाठी लढताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि भाजपामध्ये थेट लढत आहे. कृषीविषयक कायदे परत घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा संताप कमी झाला आहे का आणि दुसरा, द्वेषयुक्त भाषणामुळे अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण होईल का? याशिवाय करोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि वाढलेली महागाई हे निवडणुकीचे मुद्दे आहेत की नाही हे स्पष्ट होईल. या प्रश्नाचे उत्तरही निवडणूक निकालात सापडेल. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांवर मतदान होणार असून यापैकी किमान ११० विधानसभा जागांवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाला आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांवर मतदान होणार असून यापैकी किमान ११० विधानसभा जागांवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाला आहे.

उत्तर प्रदेशात या भागात २०१७ मध्ये भाजपाने ८० जागा जिंकल्या होत्या. हे राज्यातील मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र देखील आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांच्या संगनमताने मतांच्या धर्तीवर शेतकरी आंदोलनामुळे जाटांच्या संतापाचा काय परिणाम होतो. हे देखील पाहण्यासारखे असेल. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. 

पश्चिम उत्तर प्रदेशच्या ११० जागांवर शेतकरी आंदोलनाचा प्रभाव आहे. इथे राकेश टिकैतही एक चेहरा म्हणून समोर आला आहे. ते कोणाला पाठिंबा देणार आणि भाजपाची इथं काय स्थिती असेल हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. राकेश टिकैत यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला असला, तरी त्यांचा विशिष्ट पक्षाला पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे.

होम ग्राउंड वरून मोदी देणार विजयाचा मंत्र


वाराणसी. संपूर्णानंद संस्कृत रविवारी विद्यापीठात होणाऱ्या बुथ विजय संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीत बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र देणार आहेत. कार्यक्रमात आठ विधानसभांच्या 3361 बूथचे 20166 बुथ अधिकारी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. येथे संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पदाधिकाऱ्यांना प्रवेशाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा, महानगर अध्यक्ष विद्यासागर राय यांनी सांगितले की, बूथ अधिकाऱ्यांमध्ये पंतप्रधानांशी झालेल्या संवादाबाबत प्रचंड उत्साह आहे. परिषदेत विभागीय स्तरावर कामगारांच्या बसण्यासाठी 32 ब्लॉक करण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या इच्छेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे महानगर अध्यक्षांनी सांगितले. स्टेजजवळ बांधण्यात आलेल्या गॅलरीमध्ये प्रत्येकी चार ब्लॉक आहेत. पंतप्रधान प्रथम गोल्फ कार्टमधून बूथ पदाधिकाऱ्यांकडे जाणार आहेत. जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कामगारांवर आधारित पक्ष आहे. या पक्षात पदाधिकार्‍यांपासून ते लहानमोठ्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना समान अधिकार आहेत. पीएम मोदी हे असे पहिले प्रधान सेवक आहेत, जे खालच्या आणि महत्त्वाच्या युनिट बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी जोडलेले आहेत. 


 उत्तर प्रदेशात 2002 साली झालेल्या 14व्या विधानसभा निवडणुकीत एक नवा बदल पाहायला मिळाला. गेल्या 13व्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व डोंगराळ भागांचा राज्य विधानसभेत समावेश करून 2000 मध्ये उत्तर प्रदेशचे तुकडे करून नव्याने निर्माण झालेल्या उत्तराखंड राज्यात गेले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील धनसभेच्या जागांची संख्या 403 झाली. दुसरीकडे, उत्तराखंडचे नवीन राज्य 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागले गेले. 13व्या विधानसभा निवडणुकीपर्यंत यूपीमध्ये समाविष्ट असलेले सर्व विधानसभा मतदारसंघ उत्तराखंडमध्ये गेले होते. 

 ज्यामध्ये उत्तरकाशी, टिहरी, देवप्रयाग, चक्रता, डेहराडून, मसुरी, हरिद्वार, लँडस्डाउन, रुद्रप्रयाग, बद्रीनाथ, अल्मोरा, हदवानी, नैनिताल, काशीपूर आणि पिथौरागढ असे झाले. 2002 मध्ये यूपीमध्ये झालेल्या चौदाव्या विधानसभा निवडणुकीत, राज्यातील पहिली जागा 1-नी शिवहारा, दुसरी जागा विधानसभा मतदारसंघ 2-धामपूर पी आणि शेवटच्या दोन जागा विधानसभा मतदारसंघ 402 सहारनपूर आणि विधानसभा मतदारसंघ 403 मुझफ्फराबाद होत्या. उत्तर प्रदेशच्या या नव्या स्वरूपातील विधानसभेच्या जागांच्या संख्येत बदल झाल्यामुळे वाराणसीतील काही जागांची संख्याही बदलली. राज्यातील 14व्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी 97 लाख 56 हजार 327 मतदार होते. त्यामध्ये पुरुष व पुरुष मतदारांची संख्या पाच कोटी 47 लाख 38 होती हजार ४८६ होती.

आयोध्याच्या निवडणुकीत धर्माचाच मुद्दा

आयोध्या : काळ बदलला, परिस्थिती बदलली, श्री राम मंदिराच्या उभारणीलाही सुरुवात झाली, पण हा मुद्दा अजूनही राजकारणाच्या अंडरकरंटमध्येच आहे. या निवडणुकीतील विजय-पराजयाची पटकथा या पार्श्वभूमीवर लिहिण्याचा प्रयत्न आहे. अयोध्येत पुन्हा एकदा विचारांची लढाई सुरू झाली आहे. मंदिर-मशीद वाद चव्हाट्यावर आल्यानंतर येथील निवडणुकीतील विजय-पराजयाचा निर्णय वादाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. राम मंदिर उभारणीला सुरुवात झाल्यानंतर राजकारणामधील या मुद्द्यावर पडदा पडेल असे वाटत असताना देखील निवडणूक कोणतीही असो या निवडणुकींना धर्माचा रंग अयोध्येत मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
वेळेची पर्वा न करता निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी झालेले ध्रुवीकरण विजयाचा मार्ग मोकळा करते. काळ बदलला, परिस्थिती बदलली, श्री राम मंदिराच्या उभारणीलाही सुरुवात झाली, पण हा मुद्दा अजूनही राजकारणाच्या अंडरकरंटमध्येच आहे. या निवडणुकीतील विजय-पराजयाची पटकथा या पार्श्वभूमीवर लिहिण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेली अयोध्या पुन्हा त्याच भूमिकेत आहे. भाजप, बसपा, आप यांसारख्या अनेक पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा शंख येथूनच जाहीर आणि अघोषित केला आहे. अयोध्या सोडवण्याचा प्रयत्न केला. अयोध्या अजूनही राजकारणाच्या प्रवाहात वेगाने वाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

 अयोध्या हा सर्वांच्या नाकाचा प्रश्न बनला आहे. भाजपला आपले वर्चस्व कायम ठेवून बदललेल्या परिस्थितीत आपली मते आणि राजकीय पकड याचा संदेश द्यायचा आहे. मात्र, अयोध्येच्या राजकीय कब्जासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी आपापले योद्धे मैदानात उतरवले आहेत. अनेक दशकांपासून आपली पकड कायम ठेवणाऱ्या भाजपने आमदार वेदप्रकाश गुप्ता यांना पुन्हा पुढे केले आहे, तर सपाने गेल्या निवडणुकीत अपयशी ठरलेले तेज नारायण पांडे पवन यांना उमेदवारी दिली आहे. बसपने रवी मौर्य यांना नवा उमेदवार उभा केला आहे, तर काँग्रेसने नऊ वर्षांनंतर रिटा मौर्य या महिला उमेदवाराला उभे केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या दर्शन-पूजेनंतर उत्साहात ‘आप’ने जिल्ह्यातील इतर जागांसह येथेही उमेदवार उभे केले आहेत. 

सर्वसामान्यांच्या नजरेत सपाचे उमेदवार तेज नारायण पांडे हे व्यवहारी, बोलके आणि लोकांमध्ये राहिले आहेत. तो अवाजवी बोलतो आणि मुद्दे खोटे बोलतो. पण, त्यांच्या आमदारकीच्या काळात झालेल्या नाराजीचा परिणाम अजूनही जाणवत आहे. येथून आमदार असलेले डॉ. निर्मल खत्री यांनी राज्यात राज्यमंत्री, दोन वेळा खासदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, भाजपचे अनेकवेळा आमदार, राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले लल्लू सिंह. , दोन वेळा खासदारकीसह संघटनेच्या अनेक मोठ्या पदांवर राहिले आहेत. भाजप आणि सपाच्या उमेदवारांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. भाजपचे उमेदवार वेदप्रकाश गुप्ता चौथ्यांदा रिंगणात आहेत. ते 2007 च्या निवडणुकीत सपाच्या तिकिटावर आणि 2012 च्या निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर रिंगणात उतरले होते, पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता. 

 पक्ष बदलल्यानंतर गुप्ते 2017 मध्ये भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरले आणि विधानसभेत पोहोचले. सपा उमेदवार तेज नारायण पांडे हे पवन लखनौ विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणाचे उत्पादन आहे. 2012 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना अयोध्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी निवडणूक जिंकली. 1991 नंतर अयोध्येत भगवा ब्रिगेडचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती, परंतु 2017 च्या निवडणुकीत सपाच्या तिकिटावर पराभव झाला. पुन्हा एकदा सपाने त्यांना या व्हीआयपी जागेवरून उमेदवारी दिली आहे. बसपाचे उमेदवार रवी मौर्य हे पक्षाच्या कॅडरचे नेते आहेत. 

 ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे काँग्रेसकडून रिता मौर्य यांचीही ही पहिलीच राजकीय कसोटी आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि सपा नेहमीच आमनेसामने राहिले आहेत. यावेळीही या दोघांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि बसपा तिरंगी करून मुख्य लढतीत उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. जुन्या पिढीतील नेत्याची ओळख असलेले भाजपचे उमेदवार वेदप्रकाश गुप्ता हे विनम्र, मितभाषी आणि मनमिळाऊ आहेत, मात्र गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य मतदारांमध्ये फारसे बोलके झाले नाहीत.

बनारस उर्फ काशी उर्फ वाराणसी मराठी नातं

बनारस उर्फ काशी उर्फ वाराणसी... या प्राचीन अध्यात्मिक, सांस्कृतिक शहराशी मराठी मंडळींचे नाते अनेक शतकांपासूनचे. याच वाराणसीच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होम ग्राउंडवरील रणधुमाळीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील एक महिला नेता प्रभावी भूमिका निभावत आहे... त्यांचे नाव विजया रहाटकर. भाजपच्या राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व औरंगाबादच्या माजी महापौर असलेल्या विजया रहाटकर इथे वाराणसीत तळ देऊन बसल्या आहेत. फक्त वाराणसी नव्हे, तर या विभागातील नऊ जिल्ह्यांमधील महिला कार्यकर्त्यांच्या समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर साहित्यकार, कलाकार, डाॅक्टर, प्राध्यापक, उद्योजक यासारख्या प्रभावशाली मतदारांशी संवाद साधण्याची जबाबदारीही पक्षाने त्यांच्याकडे सोपविली आहे. वाराणसीला मुक्काम हलवण्यापूर्वी त्या लखनौ, अयोध्या, प्रयागराजमध्ये बसून समन्वयाची जबाबदारी पार पाडत होत्या. सुमारे महिनाभरापासून त्या उत्तर प्रदेशात आहेत. वाराणसीतील एका हाॅटेलमध्ये त्यांची भेट झाली, तेव्हा त्या विविध बैठकांमध्ये व्यस्त होत्या.त्यांनी संवाद साधला. मोदी-योगी डबल इंजिन सरकार पुन्हा येणार असल्याबद्दल त्या अगदी ठाम आहेत. त्या म्हणाल्या, "गेल्या पाच वर्षांत योगी सरकारने उत्तर प्रदेशचा चेहरामोहरा बदलून टाकलाय. जीडीपी दुप्पट झालाय. कोरोनाच्या संकटातही बेरोजगारीचा दर १७ टक्क्यांवरून फक्त ४.५ टक्क्यांवर आलाय. हे राज्य देशातील दुसरया क्रमांकाची अर्थव्यवस्था बनले आहे. या ही पलीकडे जाऊन कणखर कायदा व सुव्यवस्था हे योगी सरकारचे सर्वांत बलस्थान राहिले आहे. जनतेला समाजवादीचे गुंड नको आहेत."
यूपीत पुन्हा भाजपला यश मिळवून देण्यात महिला सर्वाधिक पुढे असतील, असेही त्या म्हणाल्या. त्याचे कारण सांगताना त्या म्हणाल्या, "दीड कोटी घरांमध्ये वीज कनेक्शन, ४० लाख गरीबांना घरे, २९ लाख घरांमध्ये नळाने शुद्ध पाणीपुरवठा, सुमारे एक कोटी जनधनची खाती, उज्ज्वला योजनेचा लाखोंना लाभ यामुळे महिला मोदींसोबत आहेत. योगींनी त्या सुरक्षा दिलीय. कोरोना काळात मोदी सरकारने दिलेल्या मोफत धान्यांमुळे महिला समाधानी आहेत."

Monday, February 21, 2022

रशिया युक्रेन आमने-सामने

 


भ्रमंती हा आवडीचा विषय असल्यामुळे  सुदैवाने युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांना भेट देण्याचा योग आला. दोन्ही देश प्रगतीने आणि निसर्ग संपत्तीने संपन्न आहेत. रशिया बलाडे तर युक्रेन हा अतिशय छोटा देश आहे. छोटा असला तरी या देशांनी आपले वेगळेपण जपले आहे.


 
७/०३/२०१७ ला युक्रेन तर   २९/०९/२०१८ रशियाला जायचा योग आला. या देशांमध्ये असलेल्या विद्यापीठांना भेटीही दिल्या. विशेष म्हणजे युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या प्रत्येक तरुणाला संशोधनासाठी एक बॉडी दिली जाते. तर हीच परिस्थिती भारतात वेगळी आहे. एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांच्यामागे एक बॉडी अभ्यासाकरिता देण्यात येते. या दोन्ही देशांच्या  प्रगतीचा विचार करता अनेक क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. रस्ते, पाणी, वीज याच्या पलीकडे  इंटरनेटनेट, टेक्नॉलॉजी या  गोष्टींकडेही या देशाने गांभीर्याने पाहिले आहे.


युक्रेन हा रशियाचाच एकेकाळचा भाग असून त्यांच्यात अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसंच आर्थिक संबंध खोलवर रुजलेले आहेत. सोव्हिएत युनियनमधून वेगळा झाल्यापासून रशिया (Russia) आणि युक्रेन(Ukraine) यांच्यात अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. युक्रेन हा रशियाचाच भाग असून त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे मात्र अनेक रशियन हे स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीत. अशात युक्रेन आणि नाटो (NATO) देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व मिळण्याला रशियाचा तीव्र विरोध आहे. तसं झालं तर आशियातील रशियाचं महत्त्व कमी होणार, अशी भीती रशियाला आहे. त्यामुळे  हे दोन्ही देश एकमेकांच्या समोर आले आहेत.


युक्रेनवासीयांनी 2014 सालच्या आरंभी त्यांच्या रशियास्नेही राष्ट्राध्यक्षांना पायउतार व्हायला भाग पाडलं, तेव्हा रशियाने युक्रेनच्या दक्षिणेकडचा क्रिमियन द्विपकल्प भाग स्वतःच्या ताब्यात घेतला आणि युक्रेनच्या पूर्वेकील मोठ्या प्रांतावर ताबा घेतलेल्या फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिला. या बंडखोरांची तेव्हापासून युक्रेनच्या सैन्याशी लढाई सुरू असून या संघर्षात 14 हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे.


नाटो व युरोपीय संघ या दोन्ही युरोपीय संस्थांशी होत असलेल्या युक्रेनच्या जवळिकीला रशियाने पूर्वीपासून विरोध दर्शवला आहे. तीस देशांची सुरक्षाविषयक आघाडी असणाऱ्या नाटोमध्ये युक्रेन सहभागी होणार नसल्याची हमी पाश्चात्त्य देशांनी द्यावी, अशी रशियाची मागणी आहे. युक्रेनच्या सीमा युरोपीय संघ व रशिया या दोघांनाही लागून आहेत, पण आधीच्या सोव्हिएत संघाचा भाग राहिलेल्या युक्रेनचे रशियाशी खोलवर सामाजिक व सांस्कृतिक संबंध आहेत, आणि रशियन भाषाही तिथे व्यापक स्तरावर बोलली जाते.  हे सर्व स्नेही बंद एकच असताना हे दोन्ही देश आता वेगळ्या उंबरठ्यावर आले आहेत.
@दिगंबर दराडे
१९ फ्रेब्रुवारी २०२२, पुणे