Sunday, March 20, 2022
उजनीच्या भेटीला ''दो परदेशी''
Friday, March 18, 2022
राजस्थानचा "चंग"
Thursday, March 17, 2022
द काश्मिर फाईल्स
Thursday, March 10, 2022
असा जिंकला 'आम आदमी' !
Wednesday, March 9, 2022
...अब योगी योगी कहना है
Monday, March 7, 2022
योगी येणार पण जागा घटणार
ग्राउंड रिपोर्ट
दिगंबर दराडे
उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा सरकार स्थापन करतील. मात्र मागच्या वेळी आलेल्या तीनशे जागांचा आकडा यावेळी त्यांना पार करता येणार नाही. तर सपाची मजल दीडशे जागपर्यंत जाईल. या ठिकाणी मात्र एमआयएम फॅक्टर फारसा चालणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे.
युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.यूपी विधानसभेत एकूण 403 जागा आहेत आणि बहुमतासाठी 202 जागा आवश्यक आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ७ टप्पे करण्यात आले होते. १०, १४ , 20 , 23 , 27 फेब्रुवारी आणि 03 मार्च रोजी मतदान पार पडलं होते.
भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे, पण त्यांना किमान 80 ते 90 जागांचे नुकसान होत आहे. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व त्यांचा पक्ष 300 चा आकडा पार करणार असल्याचा दावा करत आहेत. मात्र ती परिस्थिती या निवडणुकीत पहायला मिळणार नाही. उत्तर प्रदेशचं युद्ध कोण जिंकतं हे लवकरच स्पष्ट होईल. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा कमळ फुलण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्य भाजपाला 223-228 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर समाजवादी पक्षाला 138 - 157 जागा मिळतील. उत्तर प्रदेशमध्ये बसपाला 5 - 11 तर काँग्रेसला 4 - 7 जागांवर समाधान मानावं लागणार आहे.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी सरकार सत्तेत येण्याची चिन्ह आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जोर लावला होता.
प्रचारसभेत जोरदार आरोप प्रत्योराप पाहिला मिळाले. भाजप आणि सपात चुरशीची लढत झाली. भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप पहिल्या स्थानावर असला तरी गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 403 जागांपैकी तब्बल 312 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं. त्यावेळी मोदी लाटेचा फायदा उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला झाल्याचं बोललं जात आहे.
ऐकेकाळी पुर्ण उत्तर प्रदेशवर आपली एकहाती सत्ता गाजवणारा मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षला मात्र जास्त जागा मिळवू शकत नसल्याचं चित्र आहे. तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात स्त्रीयांसाठी अनेक आश्वासन दिली तरी देखील त्यांना युपीतील जनतेन काँग्रेसला जास्त पसंती दिली नसल्याचं चित्र समोर येत आहे.