Tuesday, March 1, 2022

हरहरगंगे... प्रयागराजमध्ये योगीराजला झुकते माप


सोळाव्या शतकातील अलाहाबाद आता प्रयागराज बनले आहे. पण नाव बदलल्याने आणखी काही बदल झाला आहे का? कामाच्या जोरावर भाजप पुनरागमन करणार की समाजवादी पक्ष आपल्या सायकलचा वेग वाढवणार, हे या निवडणुकीतून पुढे येणार आहे. संगम येथील हनुमानजींच्या मंदिरात लाखो लोक सतत दर्शनासाठी येतात. त्यामुळे या शहराची वेगळी ओळख आहे. नुकत्याच झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भविष्याची फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धाळूंवर राज्यातील तरुणांचा विश्वास बसू शकत नाही. प्रयागराज आणि प्रतापगडच्या 19 विधानसभा जागांच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या बैठकीत फाफामाऊच्या बेला कचरमध्ये पंतप्रधानांनी योगी-केशव जोडीच्या कार्याचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, आशावादींच्या भविष्याशी खेळणाऱ्यांपासून यूपीला वाचवले पाहिजे. राज्यातील युवक वाचवा. 

 प्रयागराजमध्ये पुढारीच्या टीमने धनंजयसिंग ठाकूर यांना विचारले, शिक्षण रोजगार शेती हे जरी असले तरी मोदीराजच प्रयागराजमध्ये येईल. तुमच्यासाठी निवडणुकीतील मुद्दे काय असतील, यावेळी सुनील गुप्ता यांनी सांगितले, शिक्षण, सिंचन, रोजगार हे यावेळचे प्रश्न आहेत. तर. ..निसाद केवट, म्हणाले यावेळी योगी येतील आणि तेच मुख्यमंत्री होतील, मग चांगले होईल. निवडणुकीत महिलांचा मुद्दा काय असेल? यावर एक व्यक्ती म्हणाली, महिलांचा मुद्दा असा आहे की योगीजी पुन्हा येणार आहेत. असा प्रश्न विचारला असता? कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार, ही सुरक्षा आहे का, महागाई आहे का? उदय ठाकूर म्हणाले, महिलांच्या सुरक्षेचा देखील प्रश्‍न महत्त्वाचा आहे. समाजवादी पक्षाची सत्ता येणार आहे. बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, नोकऱ्या हरवल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. नुकतीच गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या प्रयागराज या ठिकाणी पार पडली. गंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक आहे. 

गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे स्थान असलेल्या या शहराला यापुढे 'प्रयागराज' म्हणून ओळखले जाणार आहे. 'प्रयाग' हे या शहराचे फार जुने नाव. मुघल सम्राट अकबराने ते बदलून 'अलाहाबाद' केले. अलाहाबादी संस्कृतीचा या देशावर प्रभाव आहे. सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्या आहे, तसाच तो राजकीयही आहे. एकूण पंधरापैकी सात पंतप्रधानांचे अलाहाबादशी गहिरे नाते राहिले आहे. या शहराच्या नामबदलाचा प्रस्ताव २५ वर्षे जुना आहे. मात्र निर्णय होत नव्हता. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मागे लावून हा निर्णय केंद्राकडून मंजूर करवून घेतला. मनोरंजक लढत उत्तर प्रदेशमध्ये आहे, जिथे काँग्रेस आणि बसपा अस्तित्वासाठी लढताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि भाजपामध्ये थेट लढत आहे. कृषीविषयक कायदे परत घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा संताप कमी झाला आहे का आणि दुसरा, द्वेषयुक्त भाषणामुळे अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण होईल का? याशिवाय करोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि वाढलेली महागाई हे निवडणुकीचे मुद्दे आहेत की नाही हे स्पष्ट होईल. या प्रश्नाचे उत्तरही निवडणूक निकालात सापडेल. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांवर मतदान होणार असून यापैकी किमान ११० विधानसभा जागांवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाला आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४०३ जागांवर मतदान होणार असून यापैकी किमान ११० विधानसभा जागांवर शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाला आहे.

उत्तर प्रदेशात या भागात २०१७ मध्ये भाजपाने ८० जागा जिंकल्या होत्या. हे राज्यातील मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र देखील आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांच्या संगनमताने मतांच्या धर्तीवर शेतकरी आंदोलनामुळे जाटांच्या संतापाचा काय परिणाम होतो. हे देखील पाहण्यासारखे असेल. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. 

पश्चिम उत्तर प्रदेशच्या ११० जागांवर शेतकरी आंदोलनाचा प्रभाव आहे. इथे राकेश टिकैतही एक चेहरा म्हणून समोर आला आहे. ते कोणाला पाठिंबा देणार आणि भाजपाची इथं काय स्थिती असेल हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. राकेश टिकैत यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला असला, तरी त्यांचा विशिष्ट पक्षाला पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे.

No comments:

Post a Comment