महाराष्ट्र विकास महामंडळ राज्य मार्ग (MSRDC) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी अवघ्या दोन अडीच वर्षातच सज्ज झाला. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम यांचा समावेश आहे. विदर्भाला बहुसंख्य ठिकाणी अत्यंत वेगवान प्रवासाचा पर्याय प्रथमच मिळाला.
नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार हा 210 किमीचा रस्ता तयार झाला. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे दोन मे रोजी उद्घाटन होणे हे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल.
अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने संथ गतीने चालवली जातात. कोणताही वन्य प्राणी रस्त्यावर आला तर त्याला कोणतीही हानी होऊ नये असा हेतू असतो. पण आता देशात असा हाय-स्पीड हायवे बनवला जात आहे, ज्यामध्ये वनक्षेत्राजवळ अंडरपास आणि पूल बांधले जातील. जेणेकरून वन्य प्राणी इकडून तिकडे जाऊ शकतील. भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे.
हा देशातील पहिला सर्वात वेगवान महामार्ग असेल. नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे असे त्याचे सुरुवातीला तांत्रिक नाव होते. ताशी 150 किमी वेगाने वाहने धावू शकतील अशा पद्धतीने ते तयार केले जात आहे. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असे नामकरण झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट मुंबई आणि नागपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी करण्याचे आहे. सध्या, दोन शहरांमधील प्रवासाची वेळ 16-18 तासांच्या दरम्यान आहे.
55,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे 70 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. सुमारे 701 किमी लांबीचा आणि 120 मीटर रुंद असलेला हा महामार्ग आहे. जानेवारी 2019 मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार हा 210 किलोमीटरचा रस्ता पहिल्या टप्प्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने नागपूर ते वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजारापर्यंत 210 किमी महामार्ग वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर डिसेंबरअखेर नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा महामार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसीला एक्स्प्रेस वेच्या बाजूने हिरवळ निर्माण करावी त्यामुळे लोकांना प्रवासाचा आनंद घेता येईल, अशा सुचना दिल्या. कलासक्त मनाच्या मुख्यमंत्र्यांची ही सुचना निसर्ग संवर्धनासाठी आणि प्रवाशांना हिरवाईचा अनुभव मिळावा यासाठी महत्त्वाची.
अनेकदा जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करताना वाहने संथ गतीने चालवली जातात. जेणेकरून कोणताही वन्य प्राणी रस्त्यावर आला तर त्याला कोणतीही हानी होऊ नये. पण आता देशात असा हाय-स्पीड हायवे बनवला जात आहे, ज्यामध्ये वनक्षेत्राजवळ अंडरपास आणि पूल बांधले जातील. जेणेकरून वन्य प्राणी इकडून तिकडे जाऊ शकतील. भारतात हे पहिल्यांदाच घडत आहे.
तीन अभयारण्यांकडे जाण्यासाठी सुध्दा या समृद्धी महामार्गावरुन रस्ता मिळेल. यामध्ये तानसा (ठाणे), काटेपूर्णा (अकोला-वाशिम सीमा) आणि कारंजा सोहोळ (वाशिम) यांचा समावेश आहे. याशिवाय या मार्गावर 35 वन्यजीव फोकस क्षेत्रे असतील. त्यापैकी 16 विदर्भात, 16 उत्तर पश्चिम घाटात आणि 3 मराठवाड्यात असतील. ते सुमारे 118 किमीच्या अंतरात असतील.
महामार्गाच्या बांधकामामुळे वन्य प्राण्यांचे जनजीवनही विस्कळीत झाले. त्यांना पूर्वीसारखे फिरता येत नाही. अशा परिस्थितीत या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भारतीय वन्यजीव संस्थेशी समन्वय केला. या अंतर्गत वन्य प्राण्यांना भीती न वाटता किंवा जीव धोक्यात न घालता रस्त्यावरून फिरता यावे हा उद्देश आहे. या एक्स्प्रेस वेमध्ये 'वाइल्डलाइफ फोकस एरिया' अंतर्गत पाच वन्यजीव पूल, विदर्भात तीन ओव्हरपास आणि औरंगाबादमध्ये दोन ओव्हरपास बांधले जातील.
या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्यातील 520 पैकी 360 किमीचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्याची 'एमएसआरडीसी'ची योजना होती. मात्र, सेलूबाजार ते शिर्डीमधील काही पुलांची कामे अद्याप अपूर्ण राहिली. दोन पॅकेजमधील कंत्राटदार बदलण्याची वेळही 'एमएसआरडीसी'वर आली. परिणामी, पहिल्या टप्प्यात नागपूर ते सेलूबाजारपर्यंतचाच टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर डिसेंबरपर्यंत नागपूर ते शिर्डी असा 520 किमीचा महामार्ग सुरू होईल.